आश्रमशाळांमधील दैनंदिन व्यवस्थापन व शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी आश्रमशाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांची दि.29/7/2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापना करण्यात आली.
सदर समिती किमान 12 ते 16 लोकांची आहे. (सदस्य सचिव वगळून)
अध्यक्षासहीत 75% सदस्य विद्यार्थ्यांचे आई-वडील / पालकांमधून निवडले आहेत. सदर सदस्यांपैकी 50% सदस्य महिला आहेत.
समितीचे कार्य
बालकांचा हक्क तसेच राज्य शासन, स्थानक प्राधिकरण, शाळा, माता, पिता आणि पालक यांची कर्तव्ये याविषयी परिसरातील जनतेला सोप्या व कल्पक मार्गाने माहिती देणे.
अशैक्षणिक कर्तव्ये शिक्षकांवर लादली जात नाहीत याचे संनियंत्रण करणे.
शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या अध्ययन सुविधांचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.
विद्यार्थ्यांच्या गैरहजर राहण्याच्या व गळतीच्या समस्यांवर उपाययोजना करणे.