एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
सरपंच व ग्रामसेवक आयोजित करणे
या प्रकल्पातंर्गत येणारे क्षेत्र जंगलव्याप्त व डोंगराळ असल्याने दळण-वळण तसेच माहीती प्रसारण्याचा सुविधांची कमतरता आहे. या भागातील बरेचसे लोक शिक्षणाचा अभावामुळे अज्ञानी असल्यामुळे शासनाचा विविध विभागाकडुन राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची माहीती त्यांचा पर्यंत पोहचत नाही. त्यामुळे ग्रामसेवक व सरपंच हे जबाबदार व्यक्ती असतात. ग्रामसेवक हा ग्रामपातळीवरील शासकीय प्रमुख असल्याने तसेच सरपंच हे ग्रामपातळीवरील राजकीय प्रमुख असतात. त्यांचा मेळावा आयोजीत करुन शासनाच्या विविध विभागाकडुन राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहीती दिल्यास तसेच त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहीती दिल्यास ते गावातील लोकांपर्यंत योजनांची माहीती पोहचवितील त्यामुळे योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यास मदत होईल. व शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या स्तरपर्यंत पोहचविण्यास मदत होईल. तसेच मेळाव्याचा माध्यामातुन आदिवासी विकास विभागाचा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देता येईल.